पुणे विभागात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील नगरपरिषदांचे निकाल जाहीर होतील. आळंदी, बारामती, लोणावळा, तळेगाव दाभाडे, जयसिंगपूर, इस्लामपूर, कराड, फलटण, पंढरपूर, बार्शी यांसारख्या प्रमुख शहरांचा यात समावेश आहे.
मराठवाड्यात (छत्रपती संभाजीनगर विभाग) छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील नगरपरिषदांमध्ये मतमोजणी होणार आहे. गंगापूर, सिल्लोड, अंबेजोगाई, माजलगाव, तुळजापूर, उदगीर, निलंगा, परळी, देगलूर, बसमतनगर यांसारख्या ठिकाणी निकाल जाहीर होतील.
अमरावती विभागात अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील नगरपरिषदांचे निकाल घोषित होतील. अकोट, मुर्तिजापूर, अचलपूर, अंजनगाव, खामगाव, शेगाव, कारंजा, रिसोड, पुसद, वणी आदी शहरांचा यात समावेश आहे.
नागपूर विभागात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांतील नगरपरिषदांमध्ये मतमोजणी होणार आहे. कामठी, काटोल, उमरेड, रामटेक, तुमसर, बल्लारपूर, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट आणि वर्धा या प्रमुख ठिकाणांचा यात समावेश आहे.
निकालाकडे सर्वांचे लक्ष
राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणांवर या निकालांचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिक निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निकालांमुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.